Saturday, August 8, 2015

प्रसारमाध्यमांची डोकी ठिकाणावर आहेत का?

सनसनाटी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी आणि त्याचबरोबर स्वत:ला लोकशाहीचे उपासक म्हणवून घेणाऱ्या काही अति रिकाम-टेकड्या वृत्तपत्रांनी डोकं गहाण ठेवल्यागत वागण्याची जणू काही एकमेकांमध्ये स्पर्धाच चालवली आहे. आता येथे विषय असा होऊ शकतो, दुसऱ्यांवर टीका करण्याच्या हेतूनेच मी हे लिखाण करत आहे. परंतु प्रिय वाचक मित्रहो, याकूब मेमनच्या नुकत्याच होऊन गेलेल्या खटल्यास ज्याप्रकारे माध्यमांनी रंगरंगोटी करून आपल्यासमोर मांडले, ते सारे पाहून आज खूप दिवसांनंतर लिखाण करावेसे वाटले तर असो.
प्रिय,
वाचक लोकहो,
            प्रसारमाध्यमे, ज्यांना लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे, त्यांचे सर्वांचे डोके ठिकाणावर आहे का? हे तपासण्याची वेळ आज जनतेवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे माध्यमांवरील तासन्तास चालणाऱ्या (निरर्थक) चर्चा आणि त्यांमुळे निर्माण होणारा सततचा संभ्रम यांपासून स्वत:ला दूर ठेवतं या टीआर्पीवाल्यांना देखील देशप्रवाहात घेऊन येण्यासाठी लोकसहभागामधून प्रयत्न व्हायला हवेत, असे वाटते.
            ब्रेकिंग न्यूजआणि त्यातहीती प्रथमत: आमच्याच वाहिनीवर आम्ही दाखवत आहोत.’ असे म्हणणाऱ्या इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांची रेलचेल वाढलेली आहे. याकूब मेमनच्या खटल्यामध्ये त्याचा दिवस कसा सुरू झाला, तो किती वाजता झोपला किंवा सकाळी किती वाजता उठला किंवा त्याने सकाळी थंड पाण्याने / गरम पाण्याने आंघोळ केली, त्याला त्याच्या आवडीचा नाश्ता खायला घातला गेला, त्याची शेवटची इच्छा विचारल्यानंतर त्याने त्याच्या मुलीशी फोनवरून बोलण्याची इच्छा बालून दाखवली, त्याला पोलिस प्रशासनाकडून कोणत्या रंगाचे कपडे घालावयास दिले, इथपासून ते त्याने फाशीस सामोरे जाण्याआधी काय म्हटले इथपर्यंत सर्व बाबी अगदी तिखटमीठ लावून रंगवून, एकाचढ एक ॅनिमेटेड व्हिडिओज् वगैरे तयार करून दाखवण्यात आले. या सर्व टीआरपीवाल्यांची अक्कल कोठे गेली होती, यावेळी?
            कारागृहाच्या बाहेर शंभर फुटांवरून अंतर्ज्ञानी असल्यागत त्यांचा हा वृत्तांकन सोहळा सुरू होता. (मी सहमत आहे, की वृत्तांकन केले जावे, परंतु त्यात पत्रकारिता धर्माचा अनादर होणार नाही, याचा विचार केला जावा. याप्रकारचा अतिउत्साही / आत्मघातकी वृत्तांकन सोहळा भावना भडकवण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी साजरा होऊ नये. याकूब नागपूर कारागृहामध्ये काय करत असावा किंवा काय करत असेल याबाबत कल्पना लढवल्या जात असतांना दुसरीकडे कारागृहाबाहेरील परिस्थिती दाखवली जात होती. याकूब मेमनचे नातेवाईक हॉटेलमधून बाहेर पडून, नागपूर कारागृहाजवळ जाईपर्यंतच्या क्षणांचे छायाचित्रण प्रक्षेपित करणे, मृतदेहाचा कारागृहापासून विमानतळापर्यंतचा प्रवास, माहीम (मुंबई) मधील तणावाचे वातावरण, जसे काय एखादा थोर नेता मरण पावला असल्यागत त्याच्या अंत्ययात्रेस जमलेला हजारोंचा जनसमुदाय, या सर्व बाबींचे अगदी साग्रसंगीत वृत्तांकन या महामहीम टीआर्पीवाल्यांनी अगदी चोखंदळपणे केले.
            परंतु यांच्या या टीआर्पीचा चढता उतरता आलेख झुलत असतांना, तिकडे रामेश्वरमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न दिवंगत डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम सर यांच्या अंत्यविधीस लाखोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायास यांनी खूप कमी महत्त्व दिले. अधून मधून खालील स्क्रोलबारवर या बातम्या झळकत होत्या एवढेच...!
            याकूब मेमनच्या फाशीचा घटनाक्रम अशाप्रकारे दाखवण्याची खरेच गरज होती का? तो कोणी देशभक्त होता का? एका निरपराधी व्यक्तीस फासावर लटकवले, किंवा भाजप सरकार सत्तेत असल्याकारणानेच एका मुस्लिम व्यक्तीस तडकाफडकी निर्णय घेऊन फासावर लटवले गेले. असे हे म्हणतात. (२० वर्षांच्यावरचा कालावधी यांच्यादृष्टीने तडकाफडकीकसा काय असू शकतो.) एका देशद्रोह्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर, राष्ट्रपती आणि राज्यपालांकडून दयेचा अर्ज फेटाळून झाल्यानंतर त्याने २० वर्षे कारावास भोगल्यानंतर या टीआर्पीवाल्यांच्या नजरेत तो निर्दोष कसा? मग १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये मरण पावलेले ते २५७ जण खुनी होते का? त्यांचा काय अपराध होता?
            हे सर्व पाहता टीआर्पीवाल्यांना खरेच अक्कल गहाण ठेवण्याची सवय आहे का? याचा आपण वाचक मित्रांनी विचार करायला हवा. कारण याकूबबाबत विविध वाहिन्यांवरून ज्या प्रकारे प्रक्षेपण केले गेले त्यामुळे मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या लोकल, रेल्वे ओस पडल्या होत्या. अठ्ठावीस हजारांच्या जवळपास पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला होता. या तणावा मधून जर एखाद्या व्यक्तीच्या हातून काही अनुचित प्रकार घडला असता, तर त्याची ठिणगी पडून देशभर प्रतिक्रिया उमटण्यास वेळ लागला नसता. अक्कलशून्य टीआर्पीवाल्यांचा हा अतिशहाणपणा, सरकारविरोधी (भाजपविरोधी) लिखाण एवढे टोकाचे होते, की त्यांनी याकूब मेमनच्या फाशीच्या दुसऱ्या दिवशी संविधानाचा अनादर करत भराभर या देशद्रोह्याच्या समर्थनार्थ लिखाणे केली तो कसा निर्दोष होता आणि याकूबला पकडले त्यावेळी तत्कालीन प्रमुख रमण यांनी २००७ साली एक लेख लिहिला होता. याबाबत अनेक महाशयांनी अनेक तर्कवितर्क लढवले. सरकारी धोरणांना एक शोकान्त उन्मादही उपमा देण्यापासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने याकूबच्या फाशीच्या विरोधात आपल्या पदाचा राजीनामा दिला. येथपर्यंत सारी थोतांडे त्यांनी अगदी सढळ अलंकारिक भाषेमध्ये मांडून टाकली. अशा प्रकरणांना व्यापक स्वरूप दिल्यानंतर देशात जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, याचे भान या टीआर्पीवाल्यांना नसते का हो? हिंदू-मुस्लिम, दलित-उच्चवर्णीय, गरीब-श्रीमंत या सर्व प्रकारांची दरी,  भेदभाव तंटा निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यामध्ये या टीआर्पीवाल्यांचा सहभाग असतो. दोन रुपड्यांची नोकरी करणारा एखाद्या वृत्तवाहिनीचा छोटामोठा ॅन्करदेखील अगदी राष्ट्रपती असल्यागत वागतो. वेळ-काळ यांचे भान बाळगता कुठेही काहीही बरळल्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण होऊ शकतो, हे या टीआर्पीवाल्यांच्या लक्षात येत असावे की नसावे? स्वत:ची पोळी भाजण्याकरता हे किती मोठा अपराध करतायत हे यांना सांगण्या आणि समजण्यापलीकडचे आहे.
            सन्माननीय वाचकहो, स्वत:ला लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणवणाऱ्या या टीआर्पीवाल्यांवर आणि त्यांच्या मानसिकतेवर खरेच प्रश्नचिन्ह उभे राहते. मी या घडीला विचार केला तो आपणा सर्व सुजाण नागरिकांच्यादेखील डोक्यात आला असावा, हीच सदिच्छा...!
            आपल्या भारत देशाने लोकशाहीमध्ये माध्यमांना पुरेशी सूट दिलेली आहे, परंतु त्याचा देशाच्या हितासाठी फायदा करून घेता हे, देशांतर्गतच तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर इंग्रज सरकारसारखा प्रेस व्हर्नॅ/क्युलर ॅक्ट लावायला हवा. (हा राग व्यक्त झालेला आहे) शेवटी लोकशाहीत कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जाऊ नये हे जरी सत्य असले तरी त्याचवेळी समाजामध्ये एकमेकांच्या वर्तणुकीचा एकमेकांस त्रास होता कामा नये, हेही तितकेच खरे! यामुळे समाजात तेढ, घबराट किंवा अस्थिरता निर्माण होणार नाही याची काळजी शेवटी सरकारने आणि लोकशाहीतील जनतेचा आवाज म्हणून प्रसारमाध्यमांनी घ्यायची असते. त्यामुळे माध्यमांनी सावधपणाची वागणूक ठेवण्याची आवश्यकता आहे. अगदी स्वत:चे पोट भरण्यापासून ते एखादी बातमी प्रसारित करण्यापर्यंत रामदास स्वामींच्या या दोन ओळी अंगीकारणे आवश्यक वाटते.
सकल कामनापूर्ती मुखे राहे सरस्वती
मधुर शब्दे बोलावया
            वाचकहो, आपण देखील एका जागरूक नागरिकाची भूमिका निभावत, माध्यमांच्या या भंपक कथा सरितांना बळी पडता भारत देशाच्या घटनेवर विश्वास ठेवणारा एक सुजाण नागरिक, म्हणून समाजात वावरायला हवे, ही विनंती कळावे.
आपलाच
लेखक मित्र

No comments:

Post a Comment