Monday, June 22, 2015

चर्चेची गुर्हाळे

संविधानाने प्रसारमाध्यमे आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांची सांगड घालत, लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे जाणून माध्यमांना संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केले आहे. परंतु याचा अर्थ वेगळाच घेतला जातो. अभिव्यक्तीच्या नावाखाली प्रसारमाध्यमांवरून चालणारी चर्चेची गुर्हाळे काय साध्य करतात? एखादा विषय तेवढ्यापुरता काही काळ चर्चिला जातो. अन्यथा वर्षपूर्ती, जयंती, पुण्यतिथीलाच एखाद्याबद्दल चर्चा होते! इतर वेळी काय? यासाठी पारदर्शक आणि सर्वसमावेशक पत्रकारिता आवश्यक आहे. फक्त टीआरपी वाढवण्यासाठी दाखवल्या जाणार्या बातम्या अथवा तासन्तास् चालणारी चर्चेची गुर्हाळे यामधून काय साध्य होणार किंवा खरेच होते का याचा विचार व्हायला हवा.
 आय्पीएल् घोटाळ्यानंतर खूप दिवसांनी नुकतेच ललित मोदी पुन्हा चर्चेत आले. प्रसारमाध्यमांनी ही बातमी देणे स्वागतार्हच आहे. परंतु आय्पीएल् घोटाळा झाल्यानंतर ललित मोदी लंडनला निसटून गेलेच कसे आणि एवढे दिवस त्यांनी तिकडे काय केले? याबाबत मधल्या काळात प्रसारमाध्यमे गप्प होती! येथे फक्तउघडा डोळे, बघा नीटअथवासबसे तेजअसून चालत नाही, दिल्या जाणार्या वृत्तांमध्ये पारदर्शकता हवी. सामान्य नागरिकांच्या सन्मानासाठी तसेच नागरिकांना खरी आणि सखोल माहिती पुरवण्यासाठी प्रसारमाध्यमे असतात, संभ्रमात टाकण्यासाठी नसतात. ललित मोदी यांना पासपोर्ट व्हिसा मिळवून देण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इंग्लंड सरकारवर दबाव टाकला वगैरे वगैरे, आरोप-प्रत्यारोप मग पंतप्रधान मोदींपर्यंत त्याची तार जुळलेली आहे का? अथवा सुषमा स्वराज यांच्या कुटुंबियांचे ललित मोदींशी चांगले संंबंध असल्याकारणाने असे झाले, यावर नुसत्या चर्चाच. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी! तीही आधी प्रसारमाध्यमांवरूनच मग विरोधी पक्षांकडून का? या प्रकरणामधील सत्य कोणी, किती आणि कसे पडताळले असेल? ललित मोदी यांच्या पत्नी कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यांच्या उपचारासाठी पोर्तुगालला जाण्याचा व्हिसा मिळवून दिला, असे सुषमा स्वराज सांगतात. यात तथ्य किती हे त्यांनाच माहिती. परंतु त्यांनी राजीनामा द्यावा अशी घटनाच घडलेली नाही. खरे पाहता मागील एक वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वात प्रभावशाली कामगिरी केलेल्या नेत्यांमध्ये अरुण जेटली यांच्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा नंबर लागतो. लिबिया, इराक तसेच येमेनमधून भारतीय नागरिकांची केलेली सुटका म्हणा किंवा भारत बांगलादेश सीमावाद सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणा या सर्व बाबतीत पारदर्शकता ठेवून परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. चीन, व्हिएतनाम, सार्क देशांचे प्रमुख तसेच अमेरिका यांच्याशी आंतरराष्ट्रीय संबंध वृद्धिंगत करण्यामागे परराष्ट्रमंत्री या नात्याने स्वराज यांनी केलेल्या प्रयत्नांना यश दिसत आहे. या सर्व गोष्टी किती वेळा प्रसारमाध्यमांनी दाखवल्या? देशाचे पंतप्रधान फ्रान्स आणि जर्मनीमध्ये ऐतिहासिक करार करत असताना आपल्या देशातील प्रसारमाध्यमे अज्ञातवासातून ताजेतवाने होऊन आलेल्या राहुल गांधींविषयी चर्चा करत होती. राहुल गांधी विपश्यना करून आले की थायलंडहून आले यावर चर्चेच्या फैरी झडल्या, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची साधी वाच्यता देखील माध्यमांनी केली नाही.
देशामध्ये सध्या चाललेल्या आर्थिक, राजकीय घडामोडींना मीठ, मिरची लावून जनतेसमोर मांडण्याचे काम हेही आर्पीवाले करत असतात. देशात भीषण दुष्काळ पडू शकतो अथवा ऊष्माघाताने 2000 च्यावर लोकांचा बळी जातो. या बातम्या बीबीसी आणि सीएन्एन्वरून झळकल्यानंतर देशातील माध्यमे जागी होतात. सरकारमध्ये सत्तेवर जो पक्ष आहे त्यांचा फक्त विरोध करणे हे तर प्रसारमाध्यमांच्या रक्तात भिनले असल्यासारखे वाटते. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप जिंकला असे म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्ष हरला असे म्हणणे योग्य ठरेल. कारण काँग्रेस पक्षाच्या अपयशाचा पाढाच प्रसारमाध्यमांनी प्रचारकाळात गिरवला होता. अण्णा हजारेंचे जंतरमंतरवरील उपोषण असो अथवा निर्भया प्रकरण असो, या टीआरपीवाल्यांनी ते असे काही रंगवले होते की जनता रस्त्यावर उतरली! परंतु तेवढ्यापुरतीच! नंतर सारे विसरून गेले, असे व्हायला नको. माध्यमांनी जनतेला सदैव जागृत ठेवण्याचे काम चांगल्या आणि पारदर्शक पद्धतीने करायला हवे. खरे किती आणि खोटे किती हे प्रत्येक गोष्टीतून पटवून द्यायला हवे. शेवटी नाण्याला दोन बाजू असतात हे लक्षात घेऊन पत्रकारांनी काम करायला हवे. येथे फक्त चर्चासत्रे आयोजित करून अथवा जाहिरातबाजी करून काही प्रश्न सुटत नसतात उलट त्यांमधील गुंता वाढत जातो, ही समाजाला प्रसारमाध्यमांनी दिलेली देणगी असते.
नुकतेच काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत म्यानमारमध्ये जाऊन भारतीय सैनिकांनी लष्करी कारवाई केली व अतिरेक्यांना त्यांची जागा दाखवली. ही कामगिरी खरेच ऐतिहासिक आहे. प्रथमत: असे काही घडले असेल आणि भारत सरकारने त्याची जबाबदारी पण घेतली असेल. परंतु देशातील काही वृत्तपत्रांच्या म्हणण्यानुसार अशी कारवाई झालीच नाही किंवा कारवाईसाठी भारतीय सैनिक म्यानमारमधील त्या जागेवर गेले तेव्हा ते आतंकवादी तेथून निसटून गेले होते किंवा एकूण मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांच्या आणि जखमी झालेल्यांच्या संख्येतदेखील वेगवेगळ्या वाहिन्यांवर वेगवेगळी माहिती पुरवली जात होती. एका दैनिकानेतर म्यानमारमधील एका लष्करी अधिकार्याच्या फेसबुक पोस्टचा हवाला देत माहिती पुरवली की म्यानमारने अशी कारवाई होऊच दिली नाही काही ठिकाणी तर जुने फोटोज् पण प्रसारित करण्यात आले! किती हा गोंधळ? यामध्ये जनता संभ्रमित होते! देशामधील प्रसारमाध्यमांनी असे संभ्रम निर्माण करणारे प्रकार चालवल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा काय राहील? तिकडे भारताच्या या कारवाईमुळे घाबरलेल्या पाकिस्तानचा तिळपापड होत असताना आपली माध्यमे अशी वागत असल्यास या अभिव्यक्तीचा हे गैरफायदा घेतात की काय अथवासबसे पहले न्यूज हमने दीच्या वल्गना किती पारदर्शक आहेत याबाबत काळजी वाटते. कारण देशातील इतर महत्त्वाच्या बातम्यांपेक्षा सलमानला शिक्षा झाली ही बातमी यांना इतर बातम्यांपेक्षा महत्त्वाची वाटते.
नेपाळमध्ये झालेला भूकंप किंवा 26/11च्या घटनेचे प्रात्यक्षिक प्रदर्शन आणि त्यावेळी माध्यमांवरून चाललेल्या चर्चा यामुळे काय साध्य झाले? भारतीय प्रसारमाध्यमांनी नेपाळमधील दुर्घटनाग्रस्त / भूकंपग्रस्त नागरिकांनाअब आप कैसा, महसूस कर रहे हो।असे प्रश्न विचारत भंडावून सोडले, असे अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय कामाचे? खरे तर धरहरा टॉवरजवळ सेल्फी काढत बसण्यापेक्षा तेथील माध्यम प्रतिनिधींनी लोकांना तातडीने मदत केली असती तर त्यांच्या टीआर्पीमध्ये तिळमात्र घट झाली नसती. भारतीय माध्यमांनी नेपाळमधून बाहेर जावे अशी विनंती यामुळेच नेपाळ सरकारला करावी लागली. 26/11 च्या घटनेचे दूरदर्शनवरील प्रसारणामुळे काय परिणाम झाले हे परत सांगण्याची गरज नाही. पत्रकारिता खरे तर नि:पक्षपाती, सत्यता पडताळणारी, दोन्ही बाजू अगदी पारदर्शकपणे दाखवणारी असावी. चर्चेच्या गुर्हाळांची फलश्रुती काय हे काही पत्रकारांच्या अरेरावी भपकेबाज आणि भंपकपणा दाखवणार्या धोरणांवरून दिसून येते. समाजामध्ये यामुळे फक्त धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. परंतु काही वेळा जागृत जनता अशा पत्रकारांना शाल जोड्यांमधूनगेट वेल सूनसांगतेच. असो हा मुद्दा खरेतर प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्या लक्षात आला तरीजे सुरू आहे ते चालू देत या धोरणांमुळे हे थांबेल असे वाटत नाही.’
बलात्काराच्या घटना घडल्यानंतर पीडितेची मुलाखत घेण्यापर्यंत काही माध्यमांची मजल जाते? माणुसकी नावाची गोष्ट विसरलेले हे प्रसारित करणारे पत्रकार खरे तर गुन्हेगारांपेक्षा अधिक दोषी आहेत असे म्हणावे लागेल. कारण जखम देणार्यापेक्षा जखमेवर मीठ चोळणारा अधिक दोषी असतो. असो. या लेखातून संपूर्णपणे फक्त माध्यमांविषयी द्वेष व्यक्त करावा अशी लेखनाची दिशा मुळीच नाही. परंतु एक सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी समाजातील सामान्य नागरिकाचा प्रसारमाध्यमांच्या या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, यावरच सारे अवलंबून आहे.


Friday, June 12, 2015

‘योग दिना’चे मोल

                 
भारतीय संस्कृतीची देणगी असलेला योग अभ्यास आणि ध्यान यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर गरज लक्षात घेता, संयुक्त राष्ट्रसंघातून २१  जून हाआंतरराष्ट्रीय योग दिनम्हणून साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार यापुढे भारतवर्षाची ही देणगी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवाच्या निरोगी आयुष्यासाठी उपयोगी पडणार आहे. नियमित व्यायाम, योग्य आणि संतुलित आहार तसेच ध्यानधारणा यांचे मानवी जीवनातील वाढते महत्त्व लक्षात घेता, हा आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या देशामध्ये देखील उत्साहात साजरा करण्यासाठी, सरकारतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
            मागील वर्षीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेमध्ये योगासन आणि प्राणायाम यांचे महत्त्व समजावून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाभ्यासाची नितांत गरज असल्याचे सर्वांना समजावून सांगितले होते, तसेच भारतीय संस्कृतीमधील आरोग्य संवर्धनाचा पाया असलेला योगाभ्यास कसा उपयोगी आहे, त्यामुळे शरीरावर आणि मानवाच्या मानसिकतेवर काय परिणाम होतात हे देखील पटवून दिले होते आणि २१  जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार संयुक्त राष्ट्रसंघाने भारताची ही मागणी मान्य करत १७७  देशांच्या पाठिंब्याने २१  जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली. योगाभ्यासाविषयी एक माहितीपुस्तिका सादर करत असताना, संयुक्त राष्ट्रसंघाने ११  डिसेंबर  २०१४  रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यास मान्यता दिली. यावेळी कॅनडा, अमेरिका आणि चीनसह एकूण १७७  देशांनी भारताच्या या भूमिकेचे स्वागत करत आपला पाठिंबा दर्शविला. यासाठी युनेस्कोने देखील पुढाकार घेतल्यामुळे युवकांसाठी मार्गदर्शनपर आणि प्रशिक्षण शिबिरांवर पुढील वर्षभरात भर देण्यात येणार आहे.
            मानवाच्या आयुष्यामध्ये नियमित व्यायाम, योगासने, ध्यानधारणा यांमुळे बदल होऊ शकतात. आयुष्य निरोगी आणि प्रसन्न राहू शकते, हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पटले असल्याकारणाने, भारतीय संस्कृतीतील योगाभ्यासास महत्त्व प्राप्त झाले असून यावेळी देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी ज्या ज्या वेळी इतर देशांच्या दौर्यावर असतात त्यावेळी देशांमध्ये त्यांच्यासमोर योगाभ्यास शिकवणार्या कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. नुकतेच पंतप्रधान चीनमध्ये असताना चीनमधील शाळकरी मुलांनी पंतप्रधान मोदींच्यासमोर योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. तर सध्या भारतामध्ये येऊन योगासने आणि ध्यानधारणा यांचे प्रशिक्षण धेऊन आपल्या मायदेशी परत जाणार्या विदेशी नागरिकांची संख्या वाढत आहे. पर्यटनाच्या निमित्ताने भारतात आलेल्या नागरिकांमध्ये देखील योगाभ्यासाबद्दल उत्कंठा दिसून येते. सध्या देशामध्ये श्री श्री रविशंकर, रामदेव बाबा, कै. अय्यंगार गुरुजी यांच्या संस्थांमार्फत योगासनाचे महत्त्व पटवून दिले जात असून विदेशी नागरिकांची गर्दी येथे दिसून येते. रामदेव बाबा हे योगगुरू म्हणून ओळखले जातात. श्री श्री रविशंकर आणि रामदेवबाबा यांच्यामार्फत परदेशांमध्ये देखील ध्यानयोग शिबिरांचे आयोजन करण्याचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढत आहे. नेपाळ, भूतान आणि चीनसारख्या शेजारील राष्ट्रांमध्ये या शिबिरांचे प्रमाण मागील काही दिवसांत वाढले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत बंगळूरू येथे नियमित योगाभ्यासाचे धडे दिले जातात.२१  जून रोजी साजर्या होणार्या पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने देखील त्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भारतामध्ये असलेल्या सर्व देशांच्या राजदूतांना आमंत्रित करण्यात आले असून, या पहिल्यावहिल्या योगदिनाचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अमिताभ बच्चन, विराट कोहली आणि शिल्पा शेट्टी हे लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम करतील, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
            राजपथावर होणार्या या कार्यक्रमात पंतप्रधानांसह भारतीय सैन्यातील काही अधिकार्यांसह सैनिक देखील सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या या साधनेची प्रतिमा योग्य रीतीने पोहोचविण्यासाठी तसेच प्रत्येक व्यक्तीस मानवी जीवनातील नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी यावेळी केंद्रीय आरोग्य आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. योगासने आणि ध्यानधारणा हा केवळ हिंदू संस्कृतीचा विचार नसून तो एक भारतीय विचार आहे. परंतु काही लोकांकडून सध्या भारतामध्ये जरी यास धार्मिक रंग दिला जात असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असल्या कारणाने हळुहळू योगाचे महत्त्व आणि मोल पुढील पिढ्यांच्या नक्कीच लक्षात येईल.
            देशातील शाळा-महाविद्यालयांमधून देखील यापुढे योगाभ्यासाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देखील नियमित व्यायाम आणि ध्यान यांचे महत्त्व पटवून देतानानिरोगी आरोग्यासाठीचा उपयोगी संदेशया दृृष्टिकोनातून योगासन अभ्यासाकडे पाहण्याचे प्रशिक्षण शाळांमधून दिले जाणार आहे. परंतु सध्या भारत देशातील तथाकथित सेक्युलरवाद मुस्लिमांनी सूर्यनमस्कार करू नये असे म्हणतो किंवा ध्यानधारणा करणे म्हणजे मूर्तिपूजेसमान असल्याचे मानतो. परंतु त्यांचा हेका लक्षात येत नाही की नमाज पढताना ते वज्रासनातच बसतात अथवा रोजा पाळतात म्हणजे उपवासच करतात. योग अभ्यास करताना सध्याच्या मानवाच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याची गरज लक्षात घेता, येथे धार्मिक अंधपणा आणणे अतिशय मूर्खपणाचे लक्षण ठरेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील समुदायाने योगाचे मानवी जीवनातील महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या प्रसारासाठी दिवस साजरा करण्याचे ठरवले असताना असे राजकारण थांबवायला हवे. भारतातील इतिहास हा वैद्यकशास्त्र आणि योगशास्त्र याबद्दल बरेच काही सांगून जातो, त्यामुळे योगासनांकडे धार्मिक भावनेने पाहणे चुकीचे ठरेल.

            आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात २१  जून रोजी योग अभ्यासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, तर दुसरीकडे भारतामध्ये काही मुस्लिम बांधवांच्या विरोधामुळे सूर्यनमस्कारांना योगदिनाच्या कार्यक्रमातून वगळण्यात आले आहे. ही धार्मिक तेढ दूर व्हायला हवी, कारण अमेरिका, चीन आणि रशियासारखे देश देखील या दिवशी योगाचे दैनंदिन आयुष्यातील निरोगी राहण्यासाठीचे महत्त्व त्यांच्या देशवासियांना प्रशिक्षणाद्वारे समजावून सांगणार आहेत. त्यामुळे सध्याच्या युवा भारताने देखील व्यसन आणि वासनांधता यांपासून दूर राहत, निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि मनावरील ताण कमी करण्यासाठी योगाभ्यास आणि ध्यानधारणा यांचा आधार घ्यायला हवा. त्यामुळे भविष्यातील भारत घडवण्यास नक्कीच हातभार लागणार आहे.

बदलत्या संस्कृतीचे साक्षीदार

बदलत्या संस्कृतीचे साक्षीदार
          आजकालची तरुण पिढी आणि बदलणारी संस्कृती यांची बदलती वागणूक पाहता, बदलणार्‍या भविष्यातील भारताचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे वाटते. पाश्चिमात्त्य विचारसरणीचा बडगा आणि साता समुद्रापल्याडच्या संस्कृतीचे आकर्षण यामुळे तरुण मुलं-मुली व्यसनाधीन आणि वासनांधतेकडे वाहवत जाताना दिसत आहेत. परिणामांचा विचार करता क्षणिक सुखांच्या मागे लागणार्‍या  तरुणांना भारतीय संस्कृतीची जाण करून देत, वेळीच आवरायला हवे, अन्यथा भारताच्या संस्कृतीचा नाश करून एकमेकांच्या ऊरावर बसून थयथया नाचायला देखील पुढील पिढ्या मागे-पुढे पाहणार नाहीत.
            काही दिवसांपूर्वी युरोपमधील संस्कृतीप्रमाणे आयर्लंडमध्ये जनतेकडून सार्वमत घेऊन समलिंगी विवाहांना सर्वानुमते मान्यता देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने गे मॅरेजला प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तेथील लोकांनी आनंदोत्सव साजरा करत पार्ट्या केल्या. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी या सर्व प्रकाराचे समर्थन करत आयर्लंडच्या जनतेचे अभिनंदन केले. यापुढील काही कालावधीनंतर अभिव्यक्तीच्या नावाखाली  आपल्या भारत देशात देखील अशा मतदानानंतर, असे विचित्र चाळे कायद्यात रुपांतरित होण्यास वेळ लागणार नाही, कारण नव्या पिढ्यांना जुन्या रितीरिवाजाप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे अंधश्रद्धाळू राहण्यास आवडत नाही म्हणे. त्यांना रात्रीच्या वेळी रेव्ह पार्ट्या करताना नंगा नाच करायला जास्त आवडू लागले आहे. अवाढव्य लोकसंख्या असलेल्या भारत देशात असे काही झाले तर विचार करा? काय महाप्रलय येईल? माणसात माणुसकी राहणार नाही. प्राचीन काळी योगसाधनेत ध्यानमग्न असलेला भारतीय युवावर्ग सध्या  संभोग आणि व्यसन यामुळे एड्ससारख्या अतिभयंकर रोगांचा बळी ठरत चालला आहे. आपल्या समाज व्यवस्थेमध्ये तर आंतरजातीय विवाहांना देखील विरोध आहे, मग गे मॅरेजला मान्यता कशी मिळू शकेल, असा फुकाचा डंका पिटवला जातो, परंतु येथे एक लक्षात घ्यावे की भारतामध्ये कायदे असोत वा नसतो लोकशाहीमुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मनमर्जीनुसार वागते. चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही...!
            आजकाल स्त्री आपल्या घरात देखील सुरक्षित राहिलेली नाही. रोज वर्तमानपत्रांमधून नवनव्या हेडलाईन्स झळकत आहेत. बापाचा मुलीवर डोळा, भावाचा बहिणीवर डोळा, दीर-भावजयीचे अनैतिक संबंध टक कुठे आई-मुलगा, सांगावयास लाज वाटावी एवढ्या खालच्या थराला समाज जात आहे, आणि यालाच समाज आपल्या परीने बदलतो आहे आणि ही काळाची गरज आहे, असे काही समाजकंटक लोक बोलत राहतात. यामध्ये राजेंद्र पचौरी, तहलका फेम तरुण तेजपाल, आसाराम बापू यांसारखे लोक देखील अडकले जातात, समाज बदलतो आहे म्हणे. अहो अशा लोकांना भर चौकात उभं करून  पोकळ बांबूंचे फटके द्यायला हवेत. भारतीय संस्कृती काय आहे, याचा सर्व समाजमान्य उच्चवर्णीयांना विसर पडतो आहे, याला इंटरनेट आणि वृत्तपत्रांच्या स्रोतांचा हातभार लागतोच. प्राचीन संस्कृतीत, एव्हाना आजदेखील काहीजण वेळ काढून योगसाधना, ब्रह्मचर्याचे पालन, युवावर्गासाठी लैंगिक शिक्षण यांचे धडे देतात. स्त्रियांच्या चारित्र्याचे रक्षण करणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य असल्याचे शिकवले जाते, परंतु आजकाल हा सारा थोतांडपणा वाटतो लोकांना, येथे य बी  सारख्या शोज् ना मान्यता मिळते. करण जोहर, रणवीर सिंह, सोनाक्षी सिन्हा यांसारखे बॉलिवूड कलाकार या कार्यक्रमाचा आनंद घेतात. येथे दीपिका पदुकोणचा इट्स माय चॉईसहा व्हिडिओ प्रदर्शित होतो, स्त्रियांना देखील पुरुषांएवढाच अतिरेक करण्याचा अधिकार हा व्हिडिओ सांगून जातो. यावरून फक्त आनंद मिळवण्यासाठी, शरीर संबंध प्रस्थापित करणार्‍या  नवपिढीतील पुरुष हा प्रत्येक स्त्रीकडे फक्त स्त्री या नजरेने पाहतो, यामुळे आजच्या समाजमान्यतेनुसार अश्लिलतेची खरी व्याख्या काय हाच कधी कधी प्रश् पडतो?
            एकीकडे गांधी मला भेटला या कवितेत अश्लील शब्द वापरले म्हणून, त्या कवीवर ३० वर्षे खटला चालतो, तर दुसरीकडे जगभरात इंटरनेटवर सुरू असलेल्या चार कोटींपेक्षा अधिक अश्लील माहिती पुरवणार्या साईट्सना आपण बंद करू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालय देते. वाढत्या इंटरनेटच्या युगात अरुणा शानबाग खटला, दिल्ली गँगरेप, शक्ति मिल खटला अशा खटल्यांचा निर्णय देताना वरवर न्याय देणार्‍या  सर्वोच्च न्यायालयाने मुळावरच घाव घालायला हवा, इंटरनेटवरील या चार कोटी साईट्स बंद केल्या किंवा देशातील कुंटणखाने बंद केले तर काय परिणाम होऊ शकतात, याचा विचार व्हायला हवा. भारतीय संस्कृतीची परिभाषा तरुण वर्गास शिकवावयास हवी. तरुणांनी पाश्चिमात्त्य संस्कृतीच्या भपकेबाजीपासून दूर राहत, त्यापासून काय घ्यायचे आणि काय नाही घ्यायचे याचा विचार करायला हवा. बदलत्या संस्कृतीचे साक्षीदार होत असताना, सर्वसामान्यपणे तरुण पिढीने समाजव्यवस्थेच्या चालीरितीत अडकता आणि अतिशयोक्तीपणे वासनांध वा व्यसनाधीन होता भविष्यातील भारत घडवायला हवा.
            भारतीय संस्कृती काय सांगते, एव्हाना कवी, लेखक स्त्री ला कोणत्या प्रकारे सन्मानित करतात याचा आदर्श घेत असताना तरुणांनी आणि तरुणींनी देखील भविष्यातील संस्कृतीस जपत, प्राचीन भारतीय संस्कृतीचा  साठा जपायला हवा. कवी कुसुमाग्रज त्यांच्या फटका या काव्यप्रकारात म्हणतात,समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खुडू नका, दासी म्हणूणी पीटू नका वा देवी म्हणूणी भजू नका.” प्राचीन भारतीय संस्कृती स्त्रियांचा आदर करावयास शिकवते, त्यामुळे स्त्रियांनी देखील काही बाबतीत आपल्या मर्यादा ओलांडता या पुरुषप्रधान संस्कृतीत वावरायला हवे. याचा अर्थ त्यांनी चूल आणि मूल या पलीकडे जाऊ नये असा होत नाही, त्यांनाही स्वातंत्र्य आहे, परंतु या स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्यासाठी उपयोग होऊ नये. वाढत्या व्यापात जबाबदारीने वागणे आणि स्त्रीला स्वातंत्र्य असणे यात फरक आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ () नुसार घरेलु हिंसा कायदा सासरी असणार्‍या स्त्रियांचे हिंसाचारापासून रक्षण करतो. परंतु सासरच्या लोकांना छळण्यासाठी ४९८ () चा शस्त्र म्हणून वापर होताना दिसून येतो, शिकलेल्या आणि कायदा माहीत असलेल्या मुली सासरच्या व्यक्तींना या कायद्याचे सतत भय दाखवत आहेत. यामुळे समाजात कायद्यांवरील विश्वासदर्शकता नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. तसेच कलम ३७७ बद्दल बोलायचे झालेच तर तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी कायदे करून बदलण्यात आलेल्या या कलमाला समाजाने स्वतःसाठी असल्यागत उपयोग करवून घेतला आहे. गतिमंद, मतिमंद मुलांवर अनैसर्गिक कृत्यांचे प्रकार वाढत आहेत. शिक्षक-मुले, शिक्षिका-मुले, शिक्षक-मुली यांचे नाते देखील यामध्ये अडकते आहे. आईसमान असलेल्या मित्राच्या आईने एका बारा वर्षाच्या मुलावर जबरदस्ती केली, तर कुठे सहा महिन्यांच्या बाळावर बलात्काराच्या घटना घडत आहेत. थांबवा रे हे सारे! या पलिकडे देखील माणुसकी नावाचे जग आहे. वयात येणार्या प्रत्येक युवक-युवतीस त्यांच्या पालकांनी लैंगिक शिक्षण जबाबदारीने दिले तर हे पुढील अतिप्रसंग टळू शकतात. परंतु पालक आणि पाल्य यांमधील हा हरवलेला संवाद भावी पिढ्यांच्या नाशास कारणीभूत ठरतो. गांधी मला भेटला या कवितेत हस्तमैथुन या शब्दाचा उल्लेख केला म्हणून त्या कवितेवर खटला भरवला जातो, येथे दररोज कोट्यवधी तरुण हस्तमैथुन करून स्वतःचे चारित्र्य क्षीण करत असतील,त्याचे काय? युवा अवस्थेतील तरुण पिढीने हे स्वतःहून बदलायला हवे. (माफी असावी अधिक प्रखर लिहितो आहे.)
            शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये खूप फरक असतो आणि  भारतीय संस्कृतीनुसार आयुष्य खूप सुंदर आहे, आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो, या भावनेने समाजात वावरा, स्त्रियांचा सन्मान करा, स्वतःसाठी जगताना कृपया व्यवनाधीनता आणि वासनांधता यांपासून दूर रहा. तरच खरा भविष्यातील युवा भारत घडले